Sunday, March 14, 2010

प्रवाह :: भाग ३

भाग ३
जर तुमच्या बाबतीत तुम्ही ठरविले आणिक तसेच झाले असे अगर घडत असेल तर समर्थ रामदास स्वामींनी उल्लेखलेला "जगी सर्व सुखी असा कोण आहे" तुम्हीच आहात याची खात्री बाळगा. रिकामे मन सैतानचे घर एतकेसे खरे नसले तरी रिकामे मन आणि वेळ विचारांची फॅक्टरी असते एतके तरी नक्कीच खरे. बर्याच गोष्टींचा विचार करण्याच्या नादात घर कसे आले काही समजलेच नाही. या वेळेस घरी आलो तेव्हा घर कशी निरालेच भासले. अगदी सर्वांना भेटवस्तू देतांना पण तितकासा उत्साह नाही वाटला अर्थातच मला माहीत नाही तेच बाकीच्यान्चे होते का?

तसे या वेळेचा कालावधी काही चांगला नव्हता, बर्याच दु:खद प्रसंगांना सामोरे गेले होते घरचे आणि मी नसल्याने मला त्यांच्या समोर आपरधीपणा सारखे वाटत होते. जेव्हा तुम्ही एखादा निर्णय घेता आणि नंतर काही काळानंतर त्यावर एकदा नजर टाकता त्या वेळेस तुमहला तुम्ही विचारात न घेतलेल्या अनेक मुद्द्यांचा उलगडा होतो आणि आपली चुक कळते जी दुरुस्तीची वेळ निघून गेलेली असते. इन शॉर्ट पोस्ट डेप्लाय्मेंट इश्यूस, आता कसे एकदम परिचयाचा शब्द वाटला ना? तसेच काहीसे माझे झाले होते.

या वेळेस नेहेमी सारख्या गप्पा रंगल्या नाहीत कारण विषयच काहीसे तसेच होते. त्याच आजी सीरीयस असल्याची बातमी समजली. मागच्या पोस्ट डेप्लाय्मेंट इश्यूस मधून थोडे तरी शिकलो होतो "जिवंत माणसांच्या भावनांची किंमत फार मोठी असते मेलेल्या माणसाच्या दु:खा पेक्षा."

दुसर्या दिवशीच्या पहाटेच्या गाडीने गावी निघालो. दुपारी पोचल्यावर थेट आइ. सी. यू. मध्ये गेलो. इतके दिवस पुस्तकातून वाचलेले आणि टी. व्ही. सीरियल्स मधे पाहिलेले एकी कडे आसु आणि दुसरी कडे हसू म्हणजे काय याची प्रतेक्श जाणिव झाली ती आजीला आइ. सी. यू. मधे अनेक सलाइनच्या नळ्यांनी वेढलेले पाहून आणि तरीही तिची हसत मुख मुद्रा मला पाहून व विचारपूस करण्याची जिद्द पाहून. मंदिराच्या रांगेत चार चार तास थांबून दर्शनात जे सुख मिळणार नाही ते मे आज अनुभुवत होतो. पण ते क्षणभंगुर होते याची मला जाणीव नव्हती. आत्ता प्रयन्त मोठ्यांच्या तोंडी एकलेला "घर घर" लागणे शब्द आज मला दिसत होते. इतक्या वेदना आणि दु:ख आयुष्यात प्रथमच मी पाहत होतो. त्याच वेळेस मला समजले गौतम बुद्ध जेव्हा राज प्रासाद सोडून बाहेर आले त्यावेळेस बाहेरच्या जगातले दु:ख पाहून इतके उद्विग्न का झाले आणि स्वताला कसे आणि का बदलले. तसेच हे पण जाणवले की आजवर आपण किती सुखात जगत आहोत आणि ज्या वेदना भोगल्या त्या किती शुलल्क होत्या.

ती रात्र पोर्णिमेची होती. डॉक्टरची तपासणीची चक्कर झाल्यावर समोरच्या गणपती मन्दिरा मधे गेलो. डोळे मिटून नमस्कार केला आणि प्रश्न पडला काय मागवे? अजुन वेदना अजुन दु:ख आणि सहानशिलतेची परीक्षा की बस त्या वेदना? शेवटी काहीच न मागता नुसतेच सुखी ठेव वेदना दूर कर अशी मागणी करून मी परतलो.

दुसर्या दिवशी पहाटेचे रेलवेचे रिज़र्वेशन होते. रात्र कशी गेली कळलेच नाही. सकाळी गाडी मधे बसल्यावर वाईट बातमी कळली. विचार केला येणार्या स्टेशन वर उतरून परत जावे आणि काही दिवस मुक्काम वाढवावा. पण मन सांगत होते "बी प्रॅक्टिकल"! तसाच प्रवास पुढे चालू ठेवला पण एक आनंद होता मेलेल्या माणसाचे दु:ख करण्या पेक्षा जिवंत माणसाच्या भेटिचा आनंद महत्वाचा असतो!


मागील लिंक्स
प्रस्तावना

भाग १

भाग २

भाग ३

भाग ४

भाग ५

महात्मा गांधीजींवर भाषण...

महात्मा गांधीजींवर भाषण
ईयत्ता चवतीचा वर्ग. मास्तर येक डोला दरवाज्याकड लावुन शिकवत होते.
ईंन्स्पेक्टर आले.
शिकवल्याप्रमान पोर ऊटली.
'येक सात नम~~~~स्ते'
'बसा बसा मुलांनो.' ईंन्स्पेक्टर म्हनला.
'मास्तर, तूमच्या वर्गातल्या सगळ्यात हुशार मूलाला ऊभ करा. मी त्याला गणीतातील काही प्रश्न विचारतो.'
'मिथन्या ऊट. ' मास्तर.
मी ऊबा रायलो. ४७ मार्क झेऊन सामाईत पयला आल्तो बोल.
'१७ गुणिले ८ कीती होतात ?' ईंन्स्पेक्टरन ईचारल.
'अं ...अं ...' माजी हातभर फाटली.
मना त १० परयंतच पाडे येत वते.
'येकशे चालीस ' मी ठोकल.
'एकशे चाळिस ? मास्तर हा तुमच्या वरगातला सगळ्यात हुशार मुलगा ना? हा चक्क एकशे चाळिस सांगतो.?' ईंन्स्पेक्टर आवाक झाल्ता.
'सर आवो हा मिथन्या हूशारच हाय. बाकीची सगली पोर दीडशेच्या वर सांगतान.'
ईंन्स्पेक्टर पयली चक्कर आली.
ईंन्स्पेक्टरच आ केलेल तोंड बंद नाय झाल तवर मास्तरनी ईचारल 'सर मूलांनी महात्मा गांधीजींवर भाषण तयार केलय. म्हणायला सांगू?'
'सांगा.' ईंन्स्पेक्टरन तोंड मिटल.
'चंद्रकांत ऊट. भाषण कर.' मास्तर न आदेश दिला.
चंद्या ऊटला न भाशनाला सुरवात केली.
'मत्मा गांधी च पुर्न नाव मोहनदास करमचंद गांधी.
२ आक्टोबर ला पोरबंदर हीत गांधीजीचा जन्म झाला.
गांधीजीचे बालपन खुपच गरीबीत गेले.
ल्हानपनी येकदा त्यांनी वडलांच्या खिच्यातून पैशे चोरले. तेसमजल्यावर वडलांनी त्यांना आवरा मारला आवरा मारला क आयूक्शान त्यांनी परत कंदीबी चोरी केली न्हाई.
आपले शालेतील शिक्शन पुर्न करुन ते विलायतेला गेले.तीते त्यानी वकीलीच शिक्शन झेतल. आनी ते भारतात परत आले.
भारतात त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला. पन तो काय चाल्ला नाय मग ते आफ्रिकेत गेले. तीते त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला. पन तो बी काय चाल्ला नाय मग ते भारतात परत आले.
काय करावे या विवंचनेत आस्ताना यकदा त्यांनी सत्याग्रह केला. तो चाल्ला.
मग त्यांनी यकापाटोपाट येक आशे भरपुर सत्याग्रह केले व थोड्याच दिवसात आक्क्या भारतात लोकप्रिय झाले.'
ईंन्स्पेक्टरला पुडच कायव आयकायला गेल नाय. तो आरवा झाल्ता.